Type Here to Get Search Results !

आर्थिक वर्षअखेरीस मंत्रालयात निधीसाठी धावपळ; कायार्लये उशिरापर्यंत

मुंबई : आर्थिक वर्ष समाप्तीच्या अखेरच्या दिवशी विभागातील अखर्चित निधी परत जाऊ नये, तसेच मंजूर निधी पदरात पाडून घेण्यासाठी सरकारच्या विविध विभागांमध्ये चढाओढ सुरू असल्याने गुरुवारी मंत्रालयातील पाचव्या मजल्यावर एकच गर्दी उसळली होती. तर आपली बिले निघावीत यासाठी अनेक मंत्र्यांच्या दालनामध्येही लगबग सुरू होती.

करोनामुळे सरकारने लागू केलेल्या वित्तीय निर्बंधामुळे अनेक विभागांचा कारभार गेले काही महिने काटकसरीने सुरू होता. मात्र गेल्या दोन- तीन महिन्यांपासून करोना नियंत्रित झाल्यानंतर वित्त विभागाने योजनांवरील खर्चाला मुभा दिली आहे. त्यामुळे राज्यभरात विकासकामांनी जोर पडकला असून मंजूर निधी खर्च करण्यावर सर्वच विभागांचा भर आहे. एरवी मार्च महिन्यात मोठय़ा प्रमाणात म्हणजेच ५५ ते ६० हजार कोटींच्या आसपास निधी खर्च होतो. यंदा सुरुवातीच्या आठ- नऊ महिन्यांत कमी प्रमाणात निधी वितरण झाले होते. मात्र आता सर्वच विभागांची निधीसाठी धावपळ सुरू आहे.

आपल्या विभागाचा निधी परत जाऊ नये यासाठी बांधकाम, आरोग्य, ग्रामविकास, जलसंपदा अशा सर्वच विभागाचे अधिकारी मंत्रालयात पाचव्या मजल्यावर वित्त विभागात धावपळ करीत असल्याचे चित्र होते. तर या विभागाचे सचिव रात्री उशिरापर्यंत आपल्या कार्यालयात ठाण मांडूुन होते. अशीच परिस्थिती मंत्र्यांच्या कार्यालयात आणि बंगल्यांवर होती. बिलांच्या  निपटाऱ्याकरिता रात्री उशिरापर्यंत कोषागरे सुरू होती. सायंकाळी ५ पर्यंत बिले स्वीकारण्यात आली. धनादेश काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरूच होते.

२० ते २२ हजार कोटींचे वितरण

गेल्या महिनाभरात निधीच्या मागणीत कमालीची वाढ झाली असून विभागाला मिळालेला निधी खर्च करण्यावर अनेक मंत्रालयांनी जोर दिला. यंदा मार्च महिन्यात किमाच ६० ते ७० हजार कोटींच्या घरात हा आकडा जाण्याची शक्यता असून अखेरच्या दिवशी २० ते २२ हजार कोटींच्या निधीची बिले निघण्याची शक्यता असल्याचे वित्त विभागातील सूत्रांनी सांगितले.



April 01, 2022 at 12:20AM

मुंबई : आर्थिक वर्ष समाप्तीच्या अखेरच्या दिवशी विभागातील अखर्चित निधी परत जाऊ नये, तसेच मंजूर निधी पदरात पाडून घेण्यासाठी सरकारच्या विविध विभागांमध्ये चढाओढ सुरू असल्याने गुरुवारी मंत्रालयातील पाचव्या मजल्यावर एकच गर्दी उसळली होती. तर आपली बिले निघावीत यासाठी अनेक मंत्र्यांच्या दालनामध्येही लगबग सुरू होती.

करोनामुळे सरकारने लागू केलेल्या वित्तीय निर्बंधामुळे अनेक विभागांचा कारभार गेले काही महिने काटकसरीने सुरू होता. मात्र गेल्या दोन- तीन महिन्यांपासून करोना नियंत्रित झाल्यानंतर वित्त विभागाने योजनांवरील खर्चाला मुभा दिली आहे. त्यामुळे राज्यभरात विकासकामांनी जोर पडकला असून मंजूर निधी खर्च करण्यावर सर्वच विभागांचा भर आहे. एरवी मार्च महिन्यात मोठय़ा प्रमाणात म्हणजेच ५५ ते ६० हजार कोटींच्या आसपास निधी खर्च होतो. यंदा सुरुवातीच्या आठ- नऊ महिन्यांत कमी प्रमाणात निधी वितरण झाले होते. मात्र आता सर्वच विभागांची निधीसाठी धावपळ सुरू आहे.

आपल्या विभागाचा निधी परत जाऊ नये यासाठी बांधकाम, आरोग्य, ग्रामविकास, जलसंपदा अशा सर्वच विभागाचे अधिकारी मंत्रालयात पाचव्या मजल्यावर वित्त विभागात धावपळ करीत असल्याचे चित्र होते. तर या विभागाचे सचिव रात्री उशिरापर्यंत आपल्या कार्यालयात ठाण मांडूुन होते. अशीच परिस्थिती मंत्र्यांच्या कार्यालयात आणि बंगल्यांवर होती. बिलांच्या  निपटाऱ्याकरिता रात्री उशिरापर्यंत कोषागरे सुरू होती. सायंकाळी ५ पर्यंत बिले स्वीकारण्यात आली. धनादेश काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरूच होते.

२० ते २२ हजार कोटींचे वितरण

गेल्या महिनाभरात निधीच्या मागणीत कमालीची वाढ झाली असून विभागाला मिळालेला निधी खर्च करण्यावर अनेक मंत्रालयांनी जोर दिला. यंदा मार्च महिन्यात किमाच ६० ते ७० हजार कोटींच्या घरात हा आकडा जाण्याची शक्यता असून अखेरच्या दिवशी २० ते २२ हजार कोटींच्या निधीची बिले निघण्याची शक्यता असल्याचे वित्त विभागातील सूत्रांनी सांगितले.

मुंबई : आर्थिक वर्ष समाप्तीच्या अखेरच्या दिवशी विभागातील अखर्चित निधी परत जाऊ नये, तसेच मंजूर निधी पदरात पाडून घेण्यासाठी सरकारच्या विविध विभागांमध्ये चढाओढ सुरू असल्याने गुरुवारी मंत्रालयातील पाचव्या मजल्यावर एकच गर्दी उसळली होती. तर आपली बिले निघावीत यासाठी अनेक मंत्र्यांच्या दालनामध्येही लगबग सुरू होती.

करोनामुळे सरकारने लागू केलेल्या वित्तीय निर्बंधामुळे अनेक विभागांचा कारभार गेले काही महिने काटकसरीने सुरू होता. मात्र गेल्या दोन- तीन महिन्यांपासून करोना नियंत्रित झाल्यानंतर वित्त विभागाने योजनांवरील खर्चाला मुभा दिली आहे. त्यामुळे राज्यभरात विकासकामांनी जोर पडकला असून मंजूर निधी खर्च करण्यावर सर्वच विभागांचा भर आहे. एरवी मार्च महिन्यात मोठय़ा प्रमाणात म्हणजेच ५५ ते ६० हजार कोटींच्या आसपास निधी खर्च होतो. यंदा सुरुवातीच्या आठ- नऊ महिन्यांत कमी प्रमाणात निधी वितरण झाले होते. मात्र आता सर्वच विभागांची निधीसाठी धावपळ सुरू आहे.

आपल्या विभागाचा निधी परत जाऊ नये यासाठी बांधकाम, आरोग्य, ग्रामविकास, जलसंपदा अशा सर्वच विभागाचे अधिकारी मंत्रालयात पाचव्या मजल्यावर वित्त विभागात धावपळ करीत असल्याचे चित्र होते. तर या विभागाचे सचिव रात्री उशिरापर्यंत आपल्या कार्यालयात ठाण मांडूुन होते. अशीच परिस्थिती मंत्र्यांच्या कार्यालयात आणि बंगल्यांवर होती. बिलांच्या  निपटाऱ्याकरिता रात्री उशिरापर्यंत कोषागरे सुरू होती. सायंकाळी ५ पर्यंत बिले स्वीकारण्यात आली. धनादेश काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरूच होते.

२० ते २२ हजार कोटींचे वितरण

गेल्या महिनाभरात निधीच्या मागणीत कमालीची वाढ झाली असून विभागाला मिळालेला निधी खर्च करण्यावर अनेक मंत्रालयांनी जोर दिला. यंदा मार्च महिन्यात किमाच ६० ते ७० हजार कोटींच्या घरात हा आकडा जाण्याची शक्यता असून अखेरच्या दिवशी २० ते २२ हजार कोटींच्या निधीची बिले निघण्याची शक्यता असल्याचे वित्त विभागातील सूत्रांनी सांगितले.


via IFTTT
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.